डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 4, 2025 8:03 PM | MEA

printer

भारतानं कायमच सर्व धर्मियांच्या स्वातंत्र्याचं समर्थन केलं आहे आणि भविष्यातही केलं जाईल-MEA

भारतानं कायमच सर्व धर्मियांच्या स्वातंत्र्याचं समर्थन केलं आहे आणि भविष्यातही ते केलं जाईल, असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनी अलिकडेच केलेल्या विधानांसंदर्भात जयस्वाल यांना विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

 

 दलाई लामा संस्था आणि दलाई लामा यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत भारत सरकार कोणताही हस्तक्षेप अथवा प्रतिक्रिया देणार नसल्याचंही जयस्वाल यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा