September 1, 2024 7:23 PM | Manoj Jarange Patil

printer

शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचं राजकारण करणं दुर्दैवी – मनोज जरांगे

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचं राजकारण होत असून हा प्रकार महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. अशा घटनेचं राजकारण करणाऱ्यांना राज्याची जनता घरी बसवेल, असं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज राजकोट इथे म्हणाले. जरांगे यांनी दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. वाढवण बंदराबाबत आपण माहिती घेत असून सरकारने स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही जरांगे यांनी यावेळी केली.