देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देणार – मंत्री चंद्रकांत पाटील

येणाऱ्या काळात देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देणार आहे. त्यामुळे उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी शिक्षणावर जास्त खर्च करायचा आहे, असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावमधल्या अंमळनेर इथं केलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.