दरम्यान राज्यातल्या २२२ नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी आज शांततेत मतदान झालं.
(सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत १७ पूर्णांक ११ शतांश टक्के मतदान झालं आहे.
पालघर जिल्ह्यात डहाणूमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ कायम असल्याने दुबार नाव असलेल्या मतदारांना मतदानापासून रोखलं आहे.
रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यामध्ये मोरा इथल्या मतदान केंद्रावर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांत वादावादी झाल्याची घटना घडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी साडेअकरापर्यंत एकूण ३० पूर्णांक ८९ शतांश टक्के मतदान झालं आहे.
नाशिक जिल्ह्यात ११ नगरपालिकांसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू झालं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात १० नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी आज अत्यंत चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. कागल तालुक्यात किरकोळ वादावादी वगळता सर्व ठिकाणी शांततेत मतदान सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
सांगली जिल्ह्यातल्या सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असून दुपारी दीड वाजेपर्यंत ४१ पूर्णांक ६७ शतांश टक्के मतदान झालं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, सिल्लोड, पैठण, खुलताबाद, गंगापूर आणि वैजापूर नगरपरिषदेसाठी मतदानाला उत्साहात सुरवात झाली.
जालना जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरु आहे.
लातूर जिल्ह्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ३८ पूर्णांक २१ शतांश टक्के मतदान झालं आहे.
नांदेड जिल्ह्यात १० नगरपरिषदा आणि एका नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे.
हिंगोली नगरपालिका निवडणुकीत मतदान केल्यानंतर घोषणाबाजी केल्यामुळे आमदार संतोष बांगर यांच्यावर गोपनीयता आणि आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल मतदान केंद्र प्रमुखाकडून मागवून पुढची कारवाई करण्यात येईल असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
धाराशिव जिल्ह्यात सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत २२ पूर्णांक ८१ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली.)