डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात ठीकठिकाणी पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत, मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर आता ओसरल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत १२ पूर्णांक ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  सध्या जायकवाडी धरणात २९ पूर्णांक ७९ शतांश टक्के पाणीसाठा असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. 

 

मान्सूनविषयी हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेत संभाव्य पूरप्रवण क्षेत्र असल्यामुळे घेऊन सांगली जिल्ह्यात राज्य शासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथक तैनात केलं आहे.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. 

जालना शहरासह जिल्ह्यात संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाला.

तर येत्या दोन दिवसांत कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या काळात किनारपट्टी भागात आणि विदर्भात सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा