राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने १५ टक्के मानधन वाढ काल जाहीर केली आहे. राज्यभरातल्या ५० हजार कर्मचाऱ्यांना जून २०२५ पासून या मानधनवाढीचा लाभ मिळेल. या कर्मचाऱ्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचारी कल्याण निधी उभारणे, यासह इतर मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | October 10, 2025 3:46 PM | Maharashtra | NHM Employees
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ
