डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विविध धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी प्रकल्पातून सध्या १ लाख २ हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या माऊली प्रतिष्ठानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख १ हजार १११ रुपये दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यात नागुर इथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बालाजी व्यंकट मोरे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जिल्हा प्रशासनाने ४ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. 

 

दरम्यान, येत्या २ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.