महाराष्ट्राला पुढे नेणं हेच महायुतीचं ध्येय – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राला पुढे नेणं हेच महायुतीचं ध्येय आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या  विदर्भातल्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर महामंडळाची पदं तात्काळ भरली जातील,  असं ते म्हणाले. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांना अडीच वर्षासाठी मंत्री पदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इतर आमदारांना संधी मिळेल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.