डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सर्वोत्तम तंत्रज्ञानानं सज्ज असलेल्या महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पामुळे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण कमी होईल तसंच जनतेमधली सायबर हल्ल्याची भीती कमी होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महा सायबर-महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचं उद्घाटन काल मुंबईत, फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सायबर गुन्ह्यांवरील त्वरीत कारवाईसाठीच्या 14407 या दूरध्वनी मदत क्रमांकाचा प्रारंभ या कार्यक्रमात करण्यात आला.

 

तंत्रज्ञान नेहमी बदलत राहतं, त्यामुळे तंत्रज्ञानातली प्रणाली हाताळणारे लोकही गतीमान असायला हवेत असं सांगून, या केंद्रात दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षित करण्याची व्यवस्था आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. कार्यक्रमाला राज्याचे पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.