सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. ते मुंबईत, सहकाराचं सक्षमीकरण आणि शासनाचं धोरण या विषयावर आयोजित परिसंवादात बोलत होते. सहकार चळवळीचं सिंहावलोकन करुन त्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण अधिक प्रगतिशील करण्यासाठी आणि सामान्य शेतकऱ्यालाही यात जोडून घेण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या सहाय्यानं राज्यात स्मार्ट आणि ऍग्री बिझनेस प्रकल्प सुरु केले असून दहा हजार गावांमधल्या प्राथमिक कृषी पतसंस्थांना प्रशिक्षण दिलं जात आहे, शिवाय त्यांना आर्थिक मदत देखील दिली जात आहे, जागतिक बँकेनं या प्रकल्पांचा अभ्यास करुन त्याविषयी समाधान व्यक्त केलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.