राज्य मंत्रिमंडळ निर्णय…

राज्यातल्या गडकिल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणची अतिक्रमण रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करायचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करायचा निर्णयही यावेळी झाला.