विधानसभा निवडणुकीत यशाचं श्रेय तिघांना एकसमान-प्रफुल पटेल

विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र म्हणून काम केलं, त्यामुळे यशाचं श्रेय या तिघांना एकसमान आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. संसद परिसरात ते  प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  तिन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चा करुन मुख्यमंत्रीपदाविषयी निर्णय घेतील आणि त्यामुळे यावरून संघर्ष निर्माण होणार नाही, असंही ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.