राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळवून देण्याचं आश्वासन आज केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिलं. धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करताना ते बोलत होते. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करु, आपद्ग्रस्तांना आणखी मदत मिळणं गरजेचं असून त्याकरता केंद्रसरकारकडून राज्याला विशेष मदतीचं पॅकेज मिळवून देण्याचा प्रयत्न करु असं आश्वासन त्यांनी दिलं. संबंधित क्षेत्रातल्या शेतकऱ्यांची कर्जं माफ करावी असं आपण बँकाना सांगणार असून, खासगी कंपन्यांनी या भागतल्या जिल्ह्यांना दत्तक घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं. आठवले यांनी आज पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला.
Site Admin | September 25, 2025 3:13 PM | Maharashtra
पूरग्रस्तांसाठी केंद्रसरकारकडून विशेष पॅकेज मिळवून देण्याचं आठवले यांचं आश्वासन
