राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात अतिवृष्टीमुळे शेतातलं पीक देखील हातातून गेलं आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. म्हणून राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
Site Admin | September 17, 2025 8:58 PM | Congress | Maharashtra
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी