केेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या देशव्यापी अभियानाला आज भुवनेश्वरच्या पुरी जिल्हातल्या साक्षीगोपाल इथून आरंभ झाला. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी एक पेड माँ के नाम या मोहिमेसाठी एक रोप लावून अभियानाचं उद्घाटन केलं.
विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून कृषी संशोधक आणि कृषी अधिकारी देशभरातल्या सातशे जिल्ह्यातल्या दीड कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यांना कृषी क्षेत्रातल्या आधुनिक संशोधनाबाबत माहिती देतील. या अभियानाच्या माध्यमातून तज्ज्ञांची २ हजार १७० पथकं देशातल्या ७२३ जिल्ह्यांमधल्या ६५ हजारपेक्षा जास्त गावांना भेट देणार आहेत. यात किमान चार वैज्ञानिक असतील. या अभियानाद्वारे देशातल्या सव्वा कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.