‘राष्ट्रीय कृषी परिषद – रब्बी अभियान २०२५’ नवी दिल्ली जवळ पूसा इथं आजपासून सुरु होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान असतील.
विविध राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे कृषी मंत्री, कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ, विज्ञान केंद्रांचे वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातले कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, धोरण कर्ते आणि राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.