डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

खरीपाच्या पेरण्यांमध्ये देशभरात यंदा १ पूर्णांक ४८ शतांश टक्के वाढ

खरीपाच्या पेरण्यांमध्ये देशभरात यंदा १ पूर्णांक ४८ शतांश टक्के वाढ झाली आहे. शेती आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने १३ जून २०२५पर्यंत खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात झालेल्या प्रगतीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाताच्या पेरणीत ५३ शतांश टक्के वाढ झाली आहे. कडधान्य पेरणीत ४७ शतांश, तेलबिया ५५ शतांश आणि ऊसाच्या पेरणीत २० शतांश टक्केची वाढ झाली आहे. तर तूर पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ११ शतांश टक्क्यांची घट झाली आहे. त्याशिवाय भरड धान्य २ शतांश टक्के आणि कापूस पेरणीत ९ शतांश टक्के घट झाली आहे. ही आकडेवारी पत्र सूचना कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.