यंदा चांगला पावसाळा होईल असा अंदाज आहे, त्यामुळे खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. ते आज नाशिक जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व बैठकीत बोलत होते. खत विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा कोकाटे यांनी दिला.
नाशिक जिल्ह्यात यंदा ६ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीसाठी प्रस्तावित आहे. त्या संदर्भात कोकाटे यांनी आढावा घेतला. यावेळी कृषी योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या घडी पुस्तिकेचं प्रकाशन, तसंच व्हाट्सअप चॅनल चा उद्घाटनही कोकटे यांच्या हस्ते झालं.