November 25, 2025 9:17 AM

printer

भारताच्या महिला कबड्डी संघाची सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी

भारताच्या महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. ढाका इथं झालेल्या सामन्यात त्यांनी काल चायनीज तैपेईच्या संघावर 35- 28 अशी मात केली. या स्पर्धेतल्या सर्व सामन्यात भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.