डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कबड्डीमध्ये भारताची गुणतालिकेत आघाडी

कबड्डीमध्ये, भारताने काल इसा स्पोर्ट्स सिटी हॉल येथे झालेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुलांच्या सामन्यात यजमान बहरीनचा 84-40 असा पराभव केला. इशांत राठीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग पाचवा सामना जिंकून विजयी घोडदौड सुरू ठेवली. यासह, भारताने गुणतालिकेत आघाडी घेतली आहे आणि अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले आहे.