भारत आणि इंग्लडदरम्यान अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या सामन्यात चुरस निर्माण झाली आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या दिवशी भारतानं ३ गडी बाद १४५ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. के. एल. राहुल यानं कसोटीतलं दहावं शतक झळकवलं. तर रिषभ पंतने ७४ धावा फटकावल्या.
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ५ गडी बाद २७८ धावा झाल्या होत्या.