झारखंडच्या सिंघभूम जिल्ह्याच्या सारांदा इथल्या जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत १५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. मारलेल्या नक्षलवाद्यांमध्ये त्यांचा प्रमुख नेता पातिराम मंझी उर्फ अनल दा यांचा समावेश असून त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षिस लावण्यात आलं होतं. प्रत्येकी दोन लाख रुपयांचं बक्षिस असलेल्या राजेश मुंडा आणि बुलबुल यांनाही ठार करण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचलकांनी दिली.
Site Admin | January 22, 2026 8:29 PM
झारखंडमध्ये चकमकीत १५ नक्षलवादी ठार