झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांची चकमक अद्याप सुरु

झारखंड राज्यातल्या सारंद जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी सुरु झालेली सुरक्षा दलांची चकमक आज दुसऱ्या दिवशीही अखंड सुरु आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी आज एका महिला नक्षलवाद्याला ठार केलं. त्यामुळं या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या १६ वर पोचली आहे. सुरक्षा दलांनी ही मोहीम अधिक तीव्र केली असून ते उर्वरित नक्षलवाद्यांचाही  कसून शोध घेत आहेत.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.