डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर कालवश

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण तसंच पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवलं होतं. ब्रिटनमधल्या केंब्रिज इथून डॉक्टरेट आणि रँग्लर या प्रतिष्ठित पदव्या घेतल्यानंतर त्यांनी १९७२ मध्ये मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत खगोलशास्त्र विभाग प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली.  फ्रेड हॉयल यांच्यासह त्यांनी मांडलेला हॉयल-नारळीकर सिद्धांत प्रसिद्ध आहे. पुण्यात आयुका या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी ‘पोस्टकार्डावरील विज्ञान’ सारख्या अभिनव कल्पना राबवल्या. विज्ञानकथांबरोबरच विज्ञानावरील विपुल लिखाण त्यांनी केले. त्यांच्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 

 

‘भारतात खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात नारळीकर यांनी अमूल्य योगदान दिलं, आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय संशोधनात मोलाची भर घातली’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी नारळीकर यांना आदरांजली वाहिली. ‘नारळीकर यांच्या निधनाने ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला तेजस्वी तारा निखळला आहे’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारळीकर यांना आदरांजली वाहिली आहे. ‘नारळीकरांचं निधन ही राज्याची आणि देशाची मोठी हानी आहे’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारळीकरांना आदरांजली वाहिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा