मुंबईतले कबुतरखाने हटवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेनं सुरु केलेल्या कारवाई विरोधात जैन समाजानं आज शांतीदूत यात्रा काढली. या कारवाईमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचं जैन समाजानं म्हटलं आहे. तर बिल्डर लॉबीचा दबावामुळे कबुतरखाना हटवला जात असल्याचा दावाही अनेकांकडून केला जात आहे.
याआधी शुक्रवारी दादर इथल्या कबुतरखान्यावरच्या कारवाईलाही जैन समाजानं विरोध केला होता. त्यानंतर पालिकेनं काल ताडपत्री लावून कबुतरखाना बंद केला आणि कबुतरांना खायला घालण्यावर बंदी असल्याची सूचना लावली आहे.