डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू आणि काश्मीर मधून कलम 370 रद्द करण्यात आलं त्याला 5 वर्षे पूर्ण

जम्मू आणि काश्मीर मधून कलम 370 रद्द करण्यात आलं त्याला आज 5 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू जिल्ह्यातील अखनूर भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी सुरक्षाउपाय करण्यात येत असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याचं जम्मू चे पोलिस अधीक्षक अजय शर्मा यांनी सांगितलं आहे.