डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा

भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम ठाणे महापालिकेच्या शुद्धीकरण केंद्रांच्या कामावर होऊन ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. पिसे आणि शहाड इथल्या शुद्धीकरण केंद्रांजवळच्या नदी पात्रात जमा झालेला गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ९, १० आणि ११ जुलै रोजी अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.