January 17, 2026 1:49 PM | India | Iran

printer

इराणमधले भारतीय नागरिक मायदेशी परतले

इराणमधल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक काल भारतात परतले. भारतीय नागरिकांनी इराण सोडावं, असं आवाहन सरकारने केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर इराणमधून भारतीयांनी परतायला सुरुवात केली आहे. भारत सरकार इराणमधल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून भारतीय नागरिकांच्या  सुरक्षिततेसाठी सरकार वचनबद्ध आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे.