आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चंडिगडमध्ये झालेल्या पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं पंजाब किंग्जवर ८ गडी राखून विजय मिळवला आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पंजाब किंग्ज संघानं दिलेलं १०२ धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्सनं केवळ १० षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं.
आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. यातील विजेता संघ १ जून रोजी पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाबरोबर खेळेल. आणि या सामन्यातील विजेता संघ ३ जूनला अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी लढत देईल.