डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतीय हल्ल्यात पाकिस्तानची संरक्षण प्रणाली नष्ट

भारतीय संरक्षण दलानं आज सकाळी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला. यात लाहोर इथली संरक्षण प्रणाली नष्ट झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत आहे, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. 

 

पाकिस्ताननं भारतातल्या  श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, जलंधर, लुधियाना, भटिंडा, चंडीगड, भुज या भागात काल रात्री क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. हे हल्ले भारताच्या हवाई दलानं परतवून लावले. पाकिस्तानं नियंत्रण रेषेवर पूँछ, बारामुल्ला, कुपवाडा या भागात हल्ले वाढवले आहेत. पाकिस्तानी गोळीबारात तीन महिला आणि पाच बालकांसह सोळा जणांचा मृत्यू झाल्याचं संऱक्षण मंत्रालयानं कळवलं आहे. पाकिस्तानी हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देत  आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा