डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पन्नास षटकांच्या दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेची भारतावर मात

भारत आणि श्रीलंका यांच्यात काल झालेल्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत विजयासाठी 241 धावाचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 208 धावाच करु शकला. श्रीलंकेच्या जेफ्री व्हॅडरसनने भारताचे प्रमुख सहा गडी बाद केले.