भारत आणि उरुग्वे यांच्यातली चर्चेची सहावी फेरी १६ सप्टेंबर रोजी उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं झाली. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध आणि गुंतवणूक, माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, रेल्वे, आयुर्वेद आणि योग, आरोग्य इत्यादी क्षेत्रातल्या सहकार्याचा आढावा घेतला. यावेळी अनेक जागतिक प्रश्नांवरही चर्चा झाली. या चर्चेच्या फेरीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व सचिव जयदीप मुजुमदार यांनी तर उरुग्वेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व उरुग्वेचे उप परराष्ट्र व्यवहार मंत्री निकोलस अल्बरटोनी यांनी केलं.
Site Admin | September 18, 2024 1:03 PM | India | Uruguay
उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं भारत आणि उरुग्वे यांच्यात चर्चेची सहावी फेरी
