April 13, 2025 8:04 PM | India | Russia

printer

भारत – रशिया राजनैतिक संबंधांना ७८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं सायकल रॅलीचं आयोजन

भारत आणि रशिया यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना ७८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं आज नवी दिल्लीत एका सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत ३०० पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. यानिमित्तानं १९४१-१९४५ युद्धातल्या रशियाचा विजयोत्सवही साजरा केला गेला. भारतातले रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनीही यानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत.