डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पाकिस्तानचे हल्ले संरक्षण दलांनी केले निष्फळ

भारताच्या  उत्तर आणि पश्चिम भागातल्या अनेक शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय सेनादलांनी काल रात्री हाणून पाडला आहे. जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर इथं आंतरराष्ट्रीय सरहद्दीच्या भागातल्या लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला परंतु भारतीय लष्कराने तत्पर कारवाई करत तो राखला. जम्मू सतवारी, सांबा, आर एस पुरा आणि आर्निया इथं पाकिस्तानच्या दिशेनं आलेली ८ क्षेपणास्त्र मधेच रोखून निकामी करण्यात आली. सीमासुरक्षा दलानं काल जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. त्यात किमान ७ दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानातल्या धांधर रेंजमधून या हल्ल्याचा उगम होता असं आढळल्यावर सीमा सुरक्षा दलानं ती रेंजही उद्धवस्त केली.

 

दरम्यान, संघर्ष वाढवण्याची भारताची अजिबात इच्छा नसल्याचं केंद्रसरकारने स्पष्ट केलं आहे. पाकिस्तान कुरापती काढत असल्यानं त्याला चोख उत्तर देत असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा