डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं दिलेलं 172 धावांचं आव्हान भारतानं 18 षटकं आणि 5 चेंडूत साध्य केलं. सलामीवीर अभिषेक शर्मानं सहा चौकार आणि पाच षटकारांसह 39 चेंडूत 74 धावा केल्या तर शुभमन गिलनं 28 चेंडूत 47 धावा करत अभिषेकसह 105 धावांची सलामी भागीदारी केली. अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला होता.