पाकिस्ताननं भारताला त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं १२७ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेम्ब्लीमध्ये गेल्या आठवड्यात ही माहिती देण्यात आली. पाकिस्ताननं २४ एप्रिल पासून त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला भारताला प्रतिबंध केला आहे. भारतानं देखील अशाच प्रकारची बंदी घातली असून भारताचं सार्वभौमत्व आणि सुरक्षा यापुढे कोणतंही नुकसान मोठं असू शकत नाही, असं भारतानं म्हटलं आहे.
Site Admin | August 10, 2025 2:39 PM | India | Pakistan
भारताला हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं नुकसान
