डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिला आशिया चषक टी-20 स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल

महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. गत विजेत्या भारतीय संघानं बांग्लादेशचं 81 धावांचं आव्हान केवळ 11 षटकांत पूर्ण केलं.

 

भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिनं 39 चेंडूत 55 धावा केल्या. तर यजमान श्रीलंकेनं पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात 3 गडी राखून दमदार विजय प्राप्त करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.