डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिला क्रिकेट्च्या दुसऱ्या सामन्यात भारताचा आयर्लंडवर 116 धावांनी विजय

महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं झालेल्या मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात काल भारतानं आयर्लंडवर 116 धावांनी विजय मिळवला. आणि या तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकात 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 370 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं शतकी खेळी केली. हरलीन देओल, स्मृती मंधना, प्रतिका रावल यांनीही चमकदार खेळी करत भारताच्या धावसंख्येत मोठी भर टाकली. 371 धावांचं हे मोठं लक्ष्य गाठताना आयर्लंडला 254 धावांच करता आल्या. या मालिकेतला तिसरा सामना येत्या 15 तारखेला होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.