बांग्लादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीची पडताळणी सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. बांग्लादेशाच्या नागरिकांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत म्हणाले.
अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. चीननं कितीही नकार देण्याचा प्रयत्न केला तरी ही वस्तुस्थिती बदलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अरुणाचल प्रदेशातल्या महिलेला चीननं विमानतळावर अडवून ठेवल्याप्रकरणी ते बोलत होते. या कारवाईची कारणं देणं चीनी अधिकाऱ्यांना अजून जमलेलं नाही. आंतरराष्ट्रीय प्रवास नियम यासह त्यांच्याच विसा नियमांचं चीननं उल्लंघन केल्याचं जयस्वाल म्हणाले.