डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे ठोस पुरावे नसल्याची कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांची कबुली

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात होता हे आरोप करताना कॅनडाकडे कुठलेही ठोस पुरावे नव्हते. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे आरोप केल्याची कबुली कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडू यांनी त्यांच्या देशातल्या चौकशी समितीसमोर दिल्याचं वृत्त आहे.

 

यामुळं भारताची भूमिका स्पष्ट होते. भारत आणि भारताचे राजनैतिक अधिकारी यांच्यावर लावलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ एकही पुरावा कॅनडानं दिला नसल्याचा पुनरुच्चार भारतानं केला. कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडू यांच्यामुळेच दोन्ही देशातले संबंध खराब झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.