डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ब्रह्मकुमारी संस्थेच्या वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता आणि सद्भावना अभियानाचं राज्यपालांच्या उपस्थितीत उद्घाटन

आजच्या आधुनिक जगात मनुष्य एकीकडे प्रगती करत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक आणि भावनिक स्तरावर अशांत होत आहे; अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचं समाजात प्रेमभावना, शांतता आणि सद्भावना प्रसाराचं कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. ब्रह्मकुमारी संस्थेच्या वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता आणि सद्भावना अभियानाचं उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत राजभवन इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते.