डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

४१व्या भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भारतीय तटरक्षक दल ही देशाची पहिली संरक्षण फळी असून देशाच्या विशाल किनारपट्टीचं, तसंच विशेष आर्थिक प्रदेशाचं संरक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी तटरक्षक दल पार पाडतं, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली इथं केलं आहे. भारतीय तटरक्षक दल कमांडर्सच्या ४१व्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दहशतवाद, शस्त्रास्त्रं, अमली पदार्थ आणि मानवी तस्करीला आळा घालण्याचं कामही तटरक्षक दल करत असून अंतर्गत धोक्यांपासून देशाचं संरक्षण करण्यात तटरक्षक दलाचं योगदान अतिशय महत्त्वाचं असल्याचं सिंह यांनी नमूद केलं.

 

स्वदेशी बनावटीच्या उपकरणांद्वारे सशस्त्र दलं आणि भारतीय तटरक्षक दलाचं आधुनिकीकरण करायला सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आत्मनिर्भर भारताचं ध्येय गाठण्यासाठी तटरक्षक दलासाठी ३१ जहाजांची बांधणी भारतात होत असल्याची माहितीही सिंह यांनी यावेळी केली. भारतीय तटरक्षक दलाच्या या तीन दिवसांच्या बैठकीत बदलती भूराजकीय परिस्थिती आणि समुद्री सुरक्षेसंबंधीच्या गुंतागुंतीबाबत चर्चा होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.