डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दहा गडी राखून विजय

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं आज दहा गडी राखून विजय मिळवला. आज चौथ्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात आफ्रिकेनं सर्वबाद ३७३ धावा करून ३६ धावांची आघाडी घेतली होती. भारतानं हे आव्हान एकही गडी न गमावता पूर्ण केलं. 

भारतानं पहिल्या डावात ६०३ धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारत डाव घोषित केला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ २६६ धावात आटोपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने लॉरा वोलवार्द्त हिच्या १२२ आणि सुने लुस हिच्या १०९ धावांच्या जोरावर ३७३ धावांचा टप्पा गाठला आणि ३६ धावांची आघाडी घेतली. भारताच्या शफाली शहानं २४ आणि सतीश शुभा हिनं १३ धावा करत ही आघाडी लीलया पार करत विजय साकार केला

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.