येत्या दोन ते तीन दिवसांत राजस्थान, झारखंड, बिहार, ओदिशा आणि मध्य भारत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दक्षिण बिहार आणि झारखंडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागानं उद्यापर्यंत तामिळनाडू, आंध्र प्रदेश किनारी, यानम आणि रायलसीमाच्या काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.