आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आलं असून उपकर्णधारपद अक्षर पटेलकडे असेल. या संघाची घोषणा आज बीसीसीआयनं केली. इशान किशन आणि रिंकू सिंह यांनी संघात पुनरागमन केलं आहे. सलामीचे फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची नावं नक्की झालं आहे. याशिवाय, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश संघात करण्यात आला आहे. शुभमन गिल याला दुखापतीच्या भीतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा २ फेब्रुवारी ते ८ मार्च यादरम्यान होणार आहे.
Site Admin | December 20, 2025 7:17 PM | Cricket | ICC Mens T20 World Cup 2026 | T20 Cricket
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारताचा संघ जाहीर