सत्तेत आल्यावर शेतकरी आत्महत्या थांबवण्याचं शरद पवार यांचं आश्वासन

सत्ता आपल्याला मिळाली तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू आणि त्यांच्या मालाला योग्य किंमत देऊ, असं आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल पुणे इथल्या मविआ उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत दिलं. राज्यातल्या महिलांना सुरक्षितता मिळवून देणं, शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखणं, तरुणांना रोजगार मिळवून देणं हे आपलं उद्दिष्ट असून त्यासाठी मतदारांनी साथ द्यावी असं आवाहनही पवार यांना या सभेत केलं. भाजपाच्या राज्यात सहाव्या क्रमांकावर आलेला महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणू असं आश्वासनही पवार यांना या सभेत दिलं.