राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या दिवाळीनिमित्त शुभेच्छा

महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा सण म्हणजे अंधःकारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचं प्रतीक आहे असं सांगून स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी शुभेच्छा संदेशातून केलं आहे. पर्यावरण रक्षण, नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवन मूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल, समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचं आवाहनही राज्यपालांनी केलं.