आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम इथं एआय हब स्थापन करण्यासाठी पुढची पाच वर्षं १५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा गुगलनं आज केली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारत एआय शक्ती या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. एक गिगावॅट स्केल डेटा सेंटर पायाभूत सुविधा असलेल्या या हबमुळे विशाखापट्टणम जागतिक नवोन्मेषाचं केंद्र म्हणून उदयाला येईल. देशाचं डिजिटल भविष्य आणि शाश्वत विकासासाठी गुगल वचनबद्ध आहे हे या गुंतवणुकीतून दिसतं असं गुगल क्लाउडचे सीईओ थॉमस कुरियन म्हणाले.
एआय हबमुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, नागरिकांना आधुनिक साधनं मिळतील, तसंच जागतिक स्तरावर भारत तंत्रज्ञानच्या क्षेत्रात अग्रेसर होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.