डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जी-20 देशांनी महत्त्वाकांक्षा आणि अंमलबजावणी यांमधील दुवा म्हणून काम करण्याची गरज – मंत्री भूपेंद्र यादव

जी-20 देशांनी महत्त्वाकांक्षा आणि अंमलबजावणी यांमधील दुवा म्हणून काम करण्याची गरज आहे, असं मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि  हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केलं. दक्षिण आफ्रिकेत आज झालेल्या जी-20 हवामान आणि पर्यावरणीय शाश्वतता कार्यगटाच्या मंत्रीस्तरीय बैठक झाली. या बैठकीत एकजूटता, समानता आणि स्थिरता’ या विषयावर ते बोलत होते.  

 

संपूर्ण समाजाचा सहभाग असलेली ‘होल ऑफ द सोसायटी’ पद्धत आणि व्यक्तींनी अवलंबलेली पर्यावरणपूरक जीवनशैली ही अर्थपूर्ण आणि ठोस परिणामांसाठी महत्त्वाची असल्याचं यादव यांनी सांगितलं. गेल्यावर्षी जी-20 शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलेल्या मूळ तत्त्वांकडे परत जाण्याचं महत्त्व या मुद्द्याचाही पुनरुच्चार केला.