राज्यातल्या वनालगतच्या गावांमधे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कॅमेरे लावण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी आज दिले. वन्यजीव आणि मनुष्य संघर्ष टळावा यासाठी हे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. विदर्भात सातत्याने होणाऱ्या वन्यप्राणी आणि मनुष्य संघर्षाबाबत आज मंत्रालयात बैठक झाली.
जंगलातील प्राणी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, वनांमध्ये तृणभक्षक प्राण्यांसाठी गवत आणि वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करावी, तसंच वाघांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही नाईक यांनी यावेळी दिले. वन परिसरात यापूर्वीच मंजूर रस्त्यांची दुरुस्ती परवानगीसाठी अडवणूक करू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केली